भारत सरकार शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी अनेक योजना राबवत आहे. याच पंक्तीत एक नवीन योजना (Agriculture Schemes) सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आपला व्यवसाय वाढवण्यासाठी 15 लाख रुपये पर्यंतची आर्थिक (Financial) मदत दिली जाणार आहे.
कशी आहे PM Kisan FPO Yojana?
या योजनेचे नाव आहे, ‘प्रधानमंत्री किसान एफपीओ योजना’ (PM Kisan FPO Yojana). या योजनेअंतर्गत 11 किंवा अधिक शेतकरी एकत्र येऊन शेतकरी उत्पादक संघटना (FPO) स्थापन करू शकतात. या संघटनेला सरकारकडून 15 लाख रुपये पर्यंतची आर्थिक (Finance) मदत दिली जाईल. ही रक्कम शेतकरी उत्पादक संघटना आपल्या व्यवसायाच्या विस्तारासाठी वापरू शकतात.
या योजनेचे फायदे काय आहेत?
- व्यवसाय वाढ: या योजनेमुळे शेतकरी आपला व्यवसाय वाढवू शकतील.
- बाजारपेठ: शेतकरी उत्पादक संघटनांना आपले उत्पादन चांगल्या दरात विकण्यासाठी बाजारपेठ मिळेल.
- आधुनिक तंत्रज्ञान: या योजनेच्या मदतीने शेतकरी आधुनिक तंत्रज्ञान वापरून शेती करू शकतील.
- शेतकऱ्यांची एकत्रीकरण: या योजनेमुळे शेतकरी एकत्र येऊन काम करू शकतील.
कोण करू शकतो अर्ज?
- किमान 11 शेतकरी एकत्र येऊन शेतकरी उत्पादक संघटना (FPO) स्थापन करू शकतात.
- संघटनेने योग्य कागदपत्रे सादर करावी लागतील.
- अर्ज ऑनलाइन करावा लागेल.
कसे करावे अर्ज?
या योजनेचा अर्ज ऑनलाइन करण्यासाठी तुम्हाला योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल. ही योजना शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. या योजनेमुळे शेतकरी आत्मनिर्भर बनू शकतील आणि त्यांचे जीवनमान सुधारेल.